सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२

!.....एक स्वप्न.....!

https://www.facebook.com/groups/117247671728910/permalink/288591231261219/

Abhay Bhimrao Nagwanshi


काल रात्री स्वप्नात मह्या 'बाबा' आले,
मह्याकडे पाहताच 'धीरगंभीर' झाले.

बाबा म्हणाले, ' नागाच्या वंशजा आज काय विशेष माहित आहे तुला,
म्या म्हणल, 'बाबा माफ करा कालच 'गुरु पोर्णिमे' चा दिवस झाला,
'तुळसीच्या लग्नात' जेवुन हात धुतले की,
तितक्यातच 'मोहरम' आला '.

हातातल 'पुस्तक' दाखवत बाबा म्हणाले,
हे काय 'ओळखतोस' का या पुस्तकाला ?
मला वाटल बाबा आता घेतात माही 'शाला',
म्या बाबाला प्रामाणिकपणे म्हणलो,
माहित नाय बाबा थोडा शरमेने कंणलो,

बाबा म्हणाले, 'नागा हे तुझ्या मुक्तीच व्दार,
तुकारामाचा 'अभंग', शिवाजीची
'तलवार'
कबीराचा 'दोहा', बसवेश्वराचा
'सत्कार'
फुले, पेरीयारची 'कडक वाणी', शाहुचे 'सरकार'
जिजाऊची 'ममता' अन् बिरसाचा 'अधिकार'

एव्हढ सगळ ऐकाच पुस्तकात
म्या म्हणल बाबा,
याच नाव तरी काय ?
अन् तुम्ही सांगता ते कितपत खर हाय ?

बाबा म्हणाले,
'नागा, याचं नाव 'भारताचे संविधान'
फुटेल मुक्याला 'वाचा' अन् बहिर्याला 'कान',
दांभिकाला 'रट्टा' अन् स्त्रियांना
'आत्मसम्मान'
गरीबाला 'प्रेमाची साथ' अन् दुबळ्याला 'प्रथम स्थान',

मला आश्चर्य वाटलं,
मग म्या म्हणल बाबा,
'संविधान असतांना का हो
'खैरलांजी' घडावा,
'बाबरी मस्जिद' पाडुन का भाऊ आपसात लढावा,
शेतकर्याला 'आत्महत्या' करण्याचा प्रसंग का पडावा,
'स्त्रि-दलित अत्याचार' यात देह का सडावा,
'भ्रष्ट्राचाराच्या' पायी का आमचा पाय आडावा,
अन् 'गरीबाच्या पदरी' का तिरस्काराचा धोंडा पडावा

बाबा थोड्या वेळासाठी 'नाराज झाले'
पाहताच त्यांच्या 'डोळ्यात अश्रु' आले
म्या म्हणल बाबा, रडताय का तुम्ही ?
चुक झाली का माझी, गलत बोललो का मी ?

बाबा म्हणाले, नागा तुझ बरोबर आहे,
या सर्व गोष्टीची मलाही खंत आहे,

पण नागा,
'संविधान किती चांगले असेल तरी नाही फायदा होईल,
'मनुवादी' असतील चालवणारे मग ही 'मनुस्मृती' च राहिल,
मनुच्या राज्यात सर्व काही
'अराजक' होईल,
प्रत्येकजण 'अत्याचारात लाचारीत' राहील,

पण,
जर का 'बहुजन' संविधान आपल्या हातात घेईल
मग पुन्हा 'मुलनिवासि' यांचे राज्य येईल

तेव्हा राहणारच नाही कुणी
'तहानलेला उपाशी' ,
शेतकरी घेणारच नाही
'आत्महत्येची फाशी',
मग विषयच राहणार नाही
'अन्ना-केजरीवाल' पाशी,
'समीक्षा' करणार्याला 'अटल' दाखवु 'बिहार काशी',

मग 'साध्वी' चा नाद हटेल अन्
'स्वंय सेवका' चा पडदा फाटेल,
'कसाब' ला मृत्युदंड अन् पुन्हा
'अफजल' ला भिती वाटेल

'राजा अशोक-शिवाजीं' च्या स्वप्नाला साकार करु,
'भगवा निळा हिरव्या' रंगाला
'एकच रंगाचा' सार करु,

मग कोणी मनुच 'बाळ' तुम्हाला विभागणार नाही,
'रामदास' ला 'आठवेल' शहाणपण सत्तेसाठी झुकणार नाही,
'नक्षलवादी आतंकवादी' बुद्ध चरणी 'बंदुक' अर्पण करतील,
'विचारवादी' बनुन हक्क स्वाभिमानाने जगतील,

मग म्या म्हणल, 'बाबा हे केव्हा होईल,'
बाबा उद्गारले
'नागा,
विभागलेला 'मुलनिवाशी' जेव्हा एकत्र येईल,
अत्याचार करणार्याचा विरोध होईल,
जेव्हा 'संविधानाची माहिती' प्रत्येकापर्यत जाईल,
तेव्हाच 'बळीच राज येईल'
तेव्हाच 'बळीच राज येईल'

बाबाच्या 'डोळ्यात' आता एक
'तेज' वाटले,
खरच, राजेहो मला संविधानाचे
'महत्व पटले',

पण,
पाहताच बाबा....'अदृश्य' झाले,
अरे हे काय माझे 'स्वप्न' तुटले,

पण, 'बाबाच्या स्वप्नाला' आपण तुटु द्यायच नाही,
संविधानाच महत्व समजावुन देवु ठायी ठायी,
चला एकत्र होवुन 'अन्याया विरुद्ध लढु',
आता,
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही...,!'
आता,
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही.....!'



कवी: अभय भिमराव नागवंशी (नाग)
!.....एक स्वप्न.....!


काल रात्री स्वप्नात मह्या 'बाबा' आले,
मह्याकडे पाहताच 'धीरगंभीर' झाले.

बाबा म्हणाले, ' नागाच्या वंशजा आज काय विशेष माहित आहे तुला,
म्या म्हणल, 'बाबा माफ करा कालच 'गुरु पोर्णिमे' चा दिवस झाला,
'तुळसीच्या लग्नात' जेवुन हात धुतले की,
तितक्यातच 'मोहरम' आला '.

हातातल 'पुस्तक' दाखवत बाबा म्हणाले,
हे काय 'ओळखतोस' का या पुस्तकाला ?
मला वाटल बाबा आता घेतात माही 'शाला',
म्या बाबाला प्रामाणिकपणे म्हणलो,
माहित नाय बाबा थोडा शरमेने कंणलो,

बाबा म्हणाले, 'नागा हे तुझ्या मुक्तीच व्दार,
तुकारामाचा 'अभंग', शिवाजीची 
'तलवार'
कबीराचा 'दोहा', बसवेश्वराचा
'सत्कार'
फुले, पेरीयारची 'कडक वाणी', शाहुचे 'सरकार'
जिजाऊची 'ममता' अन् बिरसाचा 'अधिकार'

एव्हढ सगळ ऐकाच पुस्तकात
म्या म्हणल बाबा,
याच नाव तरी काय ?
अन् तुम्ही सांगता ते कितपत खर हाय ?

बाबा म्हणाले,
'नागा, याचं नाव 'भारताचे संविधान'
फुटेल मुक्याला 'वाचा' अन् बहिर्याला 'कान',
दांभिकाला 'रट्टा' अन् स्त्रियांना
'आत्मसम्मान'
गरीबाला 'प्रेमाची साथ' अन् दुबळ्याला 'प्रथम स्थान',

मला आश्चर्य वाटलं,
मग म्या म्हणल बाबा,
'संविधान असतांना का हो
'खैरलांजी' घडावा,
'बाबरी मस्जिद' पाडुन का भाऊ आपसात लढावा,
शेतकर्याला 'आत्महत्या' करण्याचा प्रसंग का पडावा,
'स्त्रि-दलित अत्याचार' यात देह का सडावा,
'भ्रष्ट्राचाराच्या' पायी का आमचा पाय आडावा,
अन् 'गरीबाच्या पदरी' का तिरस्काराचा धोंडा पडावा

बाबा थोड्या वेळासाठी 'नाराज झाले'
पाहताच त्यांच्या 'डोळ्यात अश्रु' आले
म्या म्हणल बाबा, रडताय का तुम्ही ?
चुक झाली का माझी, गलत बोललो का मी ?

बाबा म्हणाले, नागा तुझ बरोबर आहे,
या सर्व गोष्टीची मलाही खंत आहे,

पण नागा,
'संविधान किती चांगले असेल तरी नाही फायदा होईल,
'मनुवादी' असतील चालवणारे मग ही 'मनुस्मृती' च राहिल,
मनुच्या राज्यात सर्व काही
'अराजक' होईल,
प्रत्येकजण 'अत्याचारात लाचारीत' राहील,

पण,
जर का 'बहुजन' संविधान आपल्या हातात घेईल
मग पुन्हा 'मुलनिवासि' यांचे राज्य येईल

तेव्हा राहणारच नाही कुणी
'तहानलेला उपाशी' ,
शेतकरी घेणारच नाही
'आत्महत्येची फाशी',
मग विषयच राहणार नाही
'अन्ना-केजरीवाल' पाशी,
'समीक्षा' करणार्याला 'अटल' दाखवु 'बिहार काशी',

मग 'साध्वी' चा नाद हटेल अन्
'स्वंय सेवका' चा पडदा फाटेल,
'कसाब' ला मृत्युदंड अन् पुन्हा
'अफजल' ला भिती वाटेल

'राजा अशोक-शिवाजीं' च्या स्वप्नाला साकार करु,
'भगवा निळा हिरव्या' रंगाला
'एकच रंगाचा' सार करु,

मग कोणी मनुच 'बाळ' तुम्हाला विभागणार नाही,
'रामदास' ला 'आठवेल' शहाणपण सत्तेसाठी झुकणार नाही,
'नक्षलवादी आतंकवादी' बुद्ध चरणी 'बंदुक' अर्पण करतील,
'विचारवादी' बनुन हक्क स्वाभिमानाने जगतील,

मग म्या म्हणल, 'बाबा हे केव्हा होईल,'
बाबा उद्गारले
'नागा,
विभागलेला 'मुलनिवाशी' जेव्हा एकत्र येईल,
अत्याचार करणार्याचा विरोध होईल,
जेव्हा 'संविधानाची माहिती' प्रत्येकापर्यत जाईल,
तेव्हाच 'बळीच राज येईल'
तेव्हाच 'बळीच राज येईल'

बाबाच्या 'डोळ्यात' आता एक
'तेज' वाटले,
खरच, राजेहो मला संविधानाचे
'महत्व पटले',

पण,
पाहताच बाबा....'अदृश्य' झाले,
अरे हे काय माझे 'स्वप्न' तुटले,

पण, 'बाबाच्या स्वप्नाला' आपण तुटु द्यायच नाही,
संविधानाच महत्व समजावुन देवु ठायी ठायी,
चला एकत्र होवुन 'अन्याया विरुद्ध लढु',
आता, 
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही...,!'
आता,
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही.....!'



कवी: अभय भिमराव नागवंशी (नाग)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.