मंगळवार, २९ मे, २०१२

छ. शिवराय आणि रामदास


9) रामदासी शिष्यांमध्येच दडलंय james laine प्रकरणाचे बीज....

 रामदासी बखरीत बरेच विकृत लेखन शिवाजी महाराजान बद्दल आलेले आहे....त्या बद्दल नरहर कुरुंदकर ह्यांचे मत बघुयात.....
------ एका रामदासी बखरीत म्हटले आहे कि, शिवाजीची आपणावर निष्ठा किती , हे पाहण्यासाठी स्वामींनी एकदा राजाची पत्नीच शृंगारून पाठविण्यास सांगितले. राजेही असे स्वामीभक्त कि, त्यांनी तत्काळ पत्नी शृंगारून पाठविली. समर्थांनी आशिर्वाद्पूर्वकराजपत्नीची परत पाठवणी केली व राजाच्या निष्ठेची प्रशंसा केली. हि कहाणी का नको? अशी आख्यायिका सांगणारे एकमुर्ख व त्या ग्रंथबद्ध करून ठेवणारे शतमूर्ख. ह्या दंत कथा दोन्ही महापुरुषांची बदनामीच करतात, इतकेही त्यांना कळले नाही !!           ------------ नरहर कुरुंदकर

(माझे मत --- रामदासी बखरेत अजूनही बरेच विकृत लिखाण आहे....जसे समर्थांसाठी वाघिणीचे दुध.....दगडातून बेडूक निघणे वगैरे वगैरे..... सगळ्या भंपक कथा आहेत....शिवाजी महाराजांच्या बदनामीचा हा एक तत्कालीन कटच म्हणावा लागेल..... स्वामी भक्ती अथवा निष्ठा तपासायचीच (कल्पित) होती तर पत्नीस शृंगारून पाठवा असे लिहिण्याची  काय गरज????  लिहिणाऱ्याने किती विकृत विचार केला असेल हे लक्षात घ्यायला हवे..... महाराजांनी आपल्या बायको मुलां पेक्षा स्वराज्याला जास्त किंमत दिली एवढेही ह्या मूर्ख लेखकांना उपजले नाही........आणि किती विकृत विचारातून रामदास स्वामींचे शिवाजी महाराजांच्या वरील श्रेष्ठ पणा सिद्ध करण्याची धडपड बघा.. महाराजांच्या पत्नीसही रामदासीशिष्यांनी  त्या प्रयत्नात सोडले नाही... 
हे हे इथेच आहे खरे james laine प्रकरणाचे बीज....इथूनच चालू होतेय ते बदनामीचे सत्र....बीज इथे रोवले गेले आहे..... त्याचे रोपटे आज इकडे तिकडे दिसत आहे.... इथे रामदासांना महान करण्याच्या धडपडीसाठी  महाराजांच्या पत्नीचा अपमान.... तर james laine प्रकरणात दादोजी कोंडदेव यांना महान बनवण्याच्या धडपडीत साक्षात महाराजांच्या मातोश्रींचा अपमान...)


10) रामदासी शिष्यांचा अजून एक पराक्रम

  'राया छञपती ऐकावे वचन| रामदासी मन लावी वेगा||
रामदास स्वामी सोयरा सज्जन| त्यासी तन मन अर्पी बापा||
मारुती अवतार स्वामी प्रगटला| उपदेश केला तुज लागी|
| "
काही बनावट लोक...... वरील तुकारामांच्या ओळींचा संदर्भ देऊन तुकारामांनी शिवरायांना रामदासांचे शिष्यत्व पत्करण्यास सांगितले असे संपूर्ण पणे खोटे..आणि बनावट गोष्टी...गैरसमज पसरवत सुटलेत....त्यावर नरहर कुरुंदकर ह्यांचे मत खाली वाचावे.... डोक्यात झणझणीत प्रकाश पडेल....

                         "तुकारामाने शिवाजीस रामदासांचा उपदेश घेण्याविषयी सांगितले. हीही थापच. रामदासी संप्रदाय १६४९ ला कायम झाला. चाफळच्या पंचक्रोशीबाहेर तुकारामांच्या हयातीत रामदासांचे नाव गेले न्हवते." --------------- नरहर कुरुंदकर...

(माझे मत -- बघा....रामदासी शिष्या कुठवर पोहोचले.. थेट तुकारामांच्या अभंगात स्वतःचे अभंग च्या अभंगच प्रक्षिप्त / खोटे घुसडले...  शब्दांची हेराफेर  ठीक होते ...पण इथे तर  नवीनच तयार केलेले अभंग टाकतांना हि मंडळी दिसतात  ...... केवढे प्रताप हे.. कशासाठी??? तर काहीही करून रामदास स्वामींना श्रेष्ठत्व मिळण्यासाठी..... नाहीतर असे करायची गरजच काय ह्याचा थोडा विचार करा.... )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.