शनिवार, १९ मे, २०१२

सामाजिक विचार मंथन -- भाई माधवरावजी बागल भाग १


७)- सामाजिक विचार मंथन -- भाई माधवरावजी बागल
ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचा रामदासी प्रयत्न : - महाराजांना दादोजी कोंडदेवाने युद्धशास्त्र शिकवले नाही, रामदासाने तर नाहीच नाही. त्यांच्या अंगी ती पात्रता न्हवती. आणि राज्यारोहानापर्यंत रामदासाची व शिवछत्रपतींची गाठही पडली न्हवती.--------------
शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नाला हिंदूंचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे (प्रा. नरहरी कुरुंदकर)
-------------
किंकेड म्हणतो 
- शिवाजी हा अलौकिक असा दूरदृष्टी , सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी व राजकारण धुरंधर होता. राष्ट्रीय स्वातंत्र्य हे त्याचे एकमेव ध्येय होते.
---------------
केशव राव ठाकरे म्हणतात - शिवाजीला गोब्राह्मण प्रतिपालक ठरविण्याचा बूट ब्राह्मणांनी रचला. शिवाजीच्या पत्रव्यवहारात गाई आणि ब्राह्मण यांना स्थान न्हवते.
---------------
अर्जुनराव केळकर म्हणतात, ' स्वतःस राज्याभिषेक करून घेण्याचा निर्धार केल्यानंतर मगच मातुश्रींची संमती घेतली. नंतर महाराष्ट्रातील संतांना भेटले. रामदास हे त्यापकी एक होते. बापाची सल्लामसलत घेण्याचा प्रसंग त्यांना कधीच आला नाही. उलट बापाने विरोध केला असता त्यांनी तो मुळीच मानला नाही.
रामदास हा तर महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत केव्हाच भेटला न्हवता व त्यांची व महाराजांची गाठही पडली न्हवती. शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन करण्याची त्यांचा अंगी पात्रता न्हवती. त्यांच्या मार्गदर्शनाने समाजाची संघटनच करता आली नाही.
                ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व राखण्याचा अतिहीन प्रयत्न रामदासाने केला. ब्राह्मनाखेरीज इतर हिंदूंना रामदासाने अगदी हिनच लेखले.डोके वर काढणाऱ्यांना लाथा मारायच्या व त्याचे पुढारीपण प्रस्थापित झाले कि, त्याच्या पायावर डोके ठेवायचे !..........................
                त्यावेळी नांगरणीला ट्र्याकटर्स (tractors ) न्हवते, नांगरणीसाठी शेतकऱ्यांना बैलाची अत्यंत जरुरी होती. बैलांची पैदास गाई शिवाय होणे शक्य नाही. यादृष्टीने शिवाजी महाराज गोपालन, राष्ट्राला आवश्यक म्हणून पाहत. गोपालन झाले नसते, तर शेतकऱ्याला व त्यांच्या कुटुंबियांना जगणेच अशक्य झाले असते................
............... पण ब्राह्मण वर्ग गोपालानाकडे स्वार्थी दृष्टीने पाहत होता. शेतावर जाऊन नांगरणी - कुळवणी करणारा हा वर्ग न्हवे. स्वतःच्या जमिनी ब्राह्मणेतरांना लावून कष्टाशिवाय जगणारा हा वर्ग, गोपालानामुळे दुधदुभात्याची यांची चंगळ! गोपालानाबरोबर ब्राह्मंपालन होऊ शकत होते. म्हणून त्यांनीमहाराजांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' हा किताब देऊन टाकला.
महाराजांच्या व ब्राह्मणांच्या दृष्टीतला हा फरक होता. महाराजांची दृष्टी राष्ट्रीय होती, ब्राह्मणी जातीय होती. ती रामदासांच्या खालील श्लोकातून अगदी स्पष्टपणे दिसून येते -

..............गुरु तो सकलाशी ब्राह्मण | जरी तो झाला क्रियाहीन ||
..............तरी तयासीच शरण | अनन्य भावे असावे||
..............ब्राह्मण वेद मूर्तिमंत| ब्राह्मण तोची भगवंत||
..............पूर्ण होती मनोरथ| विप्र वाक्ये करुनी||
.............असो ब्राह्मणा सुरवर वंदिती | तेथे मानव बापुडे किती||
.............जरी ब्राह्मण मूढमती| तरी तो जगत्वान्द्या ||
.............अंत्यजे शब्द्ज्ञाता बरवा| परी तो घेऊन करावा||
.............ब्राह्मण संनिध पुजावा| हे तो न धडे कधी||

.......................... हे वाचल्यावर या गृहस्थाला कोणीही संत अगर साधू म्हणणार नाही. काय शिकवले रामदासाने?? अश्या प्रकारचे विचार, अज्ञ ब्राह्मनेतरांच्या डोक्यात ठासून घातल्यामुळे यांनी विनाश्रम दुध मिळण्याची सोय करून घेतली व शिवाजी महाराजांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' हे चिटकवून टाकले. पण कोणत्याही बखरीत महाराजांना हे विशेषण स्वतःला लावून घेतलेले नाही.

'गोब्राह्मण रक्षक' म्हणवीत नसत
    याच भटांनी राज्यारोहण होण्यापूर्वी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्यारोहानाला मान्यता दिली न्हवती. चढणाऱ्यास खाली ओढायचे. चढलेल्यांचे पायावर डोके ठेवायचे, हि त्यांची नीती. 
.............इतिहास संशोधक शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. पवार मुंबई युनिव्हर्सिटीत केलेल्या भाषणात म्हणतात,'पूर्वीच्या बखरीत अगर ऐतिहासिक कागदपत्रात महाराजांना मी 'ब्राह्मण प्रतिपालक' असे विशेषण लावलेले अगर त्यांनी लावून घेतलेले कोठेच आढळत नाही. उलट राजा जयसिन्हाला लिहिलेल्या पत्रात शिवाजीने घोड्याची शपथ घेऊन विश्वास पटवण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्ह्याच्या बाबतीत ब्राह्मणाचे पालन करण्याची हमी शिवाजीने दिली न्हवती. अशा खास सवलती पेशव्यांनी दिल्या होत्या. असा पक्षपात शिवाजीने आपल्या राज्यातप्रजाजनान्बद्दल केला न्हवता.
................. त्यांच्यात धर्माभिमान न्हवता असे म्हणणार नाही. पण तो धर्माभिमान मुसलमानांचा द्वेष करीत न्हवता. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता होता, पण याचा विचार ब्राहामनांनी केला नाही व त्यांच्या राज्यारोहानाला ते क्षुद्र मानून त्यांनी विरोध केला. पण गागा भटकडून मंत्रशुध राज्याभिषेक घेतल्यानंतर यांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' म्हणण्यास सुरुवात केली व राज्यारोहण झाल्यानंतर रामदासाला गुरुपद दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.