भारतात क्रिकेटला अवास्तव महत्त्व दिले जाते. अमेरिका, चीन, जपान, कोरिया या प्रगत देशामध्ये क्रिकेट हा खेळ अस्तित्वात नाही. ज्या देशांवर इंग्रजांचे राज्य होते, त्या देशांमध्येच हा खेळ खेळला जातो. भारतामध्ये या खेळामुळे बहुजनांचे सर्व प्रकारचे अतोनात नुकसान होते. या खेळाचे भारतात बामणांनी समर्थन केले आहे ते केवळ बहुजनांना सर्व सुखसोयींपासून वंचित ठेवण्यासाठी. क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन हे १० वी व १२ वी च्या परीक्षांच्या काळात केले जाते.
आता यात आणखी भर आय पी एल च्या सामन्यांची पडली आहे. या आय पी एल मध्ये सर्व संघ भारतीय आहेत, तसेच संघांचे मालकहि भारतीय आहेत. पण या संघांमधील खेळाडू हे देशी आणि परधेशी आहेत. म्हणजे आय पी एल सामन्यानंतर हे सर्व परदेशी खेळाडू मालकांकडून पैसा घेऊन घरी जाणार आहेत. भारतातला पैसा अश्या मार्गाने सहजपणे परदेशात जाणार. मग जे देशभक्तीच्या नावाने ओरडतात त्यांना हे दिसत नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा