सोमवार, १४ मे, २०१२

अजिंठा


अजिंठा या चित्रपटावरील मिलिंद बनसोडे यांची फेसबुक वर त्यांनी टाकलेली प्रतिक्रिया -

"एका फडतूस प्रेम कहाणीद्वारे बुद्धांच्या विकृतीकरण दाखवून निर्मिला अजिंठा मराठी चित्रपट" 
नितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित अजिंठा मराठी चित्रपट काल पाहिला.
त्यामध्ये पुष्कळ गोष्टी बुद्ध धम्माच्या विसंगत दाखविण्यात आलेल्या आहे.त्यापैकी आक्ष...ेपार्ह गोष्टी पुढीलप्रमाणे
१.राम,रहीम,बुद्ध हे एकच आहे हे विधान चित्रपटाच्या प्रारंभी करण्यात आले आहे.
२.सिद्धार्थ गौतमच्या जन्मापूर्वी जे बोधिसत्व होऊन गेले त्यांनी वानर म्हणून जन्म धारण केला होता.
३.भगवान बुद्ध हे महामानव(महापुरुष) असून त्यांना देव हे संबोधन वापरले गेले.
४.चित्रपटातील नायकाला जेव्हा चित्र रंगविण्यासाठी रंग मिळत नाही, तेव्हा त्याला असे सांगितले
 जाते की, भगवान बुद्धांच्या कृपेने सर्व शक्य होईल त्यांच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे ते चमत्कार करून ती समस्या दूर करतील 
५.बंजारा समाजची नायिका होळीच्या वेळी ज्या ठिकाणी सामुहिक नृत्य करते, त्याठिकाणी
भगवान बुद्धांची मुर्ती दाखविण्याचे नेमके प्रयोजन काय? होळी हा हिंदूचा सण आहे.
६.भगवान बुद्धांच्या समोर लेण्यामध्येच नायक व नायिका रोमान्स करतात,जर खरच नायिका बुद्धांची
निस्सीम अनुयायी असेल तर ती, लेण्यामध्ये हे कृत्य करेल काय?
७.चित्रपटात केवळ या लेण्याचे सौदर्य दाखविण्यापेक्षा नायिकेचे अर्धे उघडे शरीरच दाखविले आहे.
८.भगवान बुद्ध नायिकेला प्रकट होऊन दर्शन देताना दाखविले आहे,याचा अर्थ भगवान बुद्ध हे
दैवी शक्ती आहेत असे भासवायचे आहे.
९.भगवान बुद्धांच्या समोर नायक व नायिका हिंदू चालीरीती प्रमाने सप्तपदी चालून विवाह करतात
१०.नायकाला जो पंडित बुद्ध संस्कृतीची ओळख करून देतो,त्याचा पूर्ण पोशाख ब्राम्हण पद्धतीचा
आहे, तरी नायक त्याला भंतेजी म्हणून हाक मारतो.
सारांश, अश्या प्रकारे अजिंठा या चित्रपटात भगवान बुद्धांची ओळख ईश्वर म्हणूनच हेतुपुरस्पुर्वक
केल्याचे दिसून येते. भगवान बुद्ध हे स्वत : सांगत असताना की, मी इतर मनुष्य प्राण्याप्रमाणे मनुष्य आहे. मी मार्गदाता आहे,मोक्षदाता नाही.ईश्वर,आत्मा,पुनर्जन्म नाही.मी सांगितलेल्या धम्मात या गोष्टीला मुळीच स्थान नाही. केवळ या मानवी जीवनात सदाचरण करून मनुष्य सुखी होऊ शकतो,इतकी साधी व सोपी शिकवण भगवान बुद्धांची असताना त्यांना हिंदू धर्मातील ज्या गोष्टी कधीच मान्य नसताना त्याच त्यांच्यावर नावावर खपवून या चित्रपटात दिग्ददर्शकाने एकप्रकारे भगवान बुद्धांच्या विचारांचे विकृतीकरण केले आहे. या 
आधीही भारतभर ज्या बुद्ध लेण्या आहेत, त्यांची नावे बदलून या लोकांनी पांडवलेणी, कैलास लेणी इ. अशी हिंदुधर्मातील देवांची नावे दिली आहे.बुद्ध संस्कृतीचे विद्रुपीकरण हे लोक सतत कोणत्या न कोणत्या मार्गाने करत 
असतात. तरीसुद्धा आम्ही बुद्ध धम्माचे लोक या गोष्टीचा साधा निषेध नोंदवत नाही की, एकत्र येऊन याचा विरोध करत नाही. हीच आपल्या बुद्ध धम्मियांची खरी शोकांतिका म्हणावी लागेल,दुसरे काय ? 
मिलिंद बनसोडे (सारीपुत्र )
नाशिक मो.९९६०३२००६३.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.