दैनिक पुढारी अहमद nagar आवृत्ती दिनांक २९ मार्च पण नो. ३ वरील बातमी....
तुकारामांच्या नावे नोंदविलेले चमत्कार दुर्दैवी : डॉ. साळुंखे
महाजनांच्या कुटुंबात जन्माला आलेल्या तुकोबांनी गावातील लोकांची जी कर्जाची कागदपत्रे घरी होती, ती इंद्रायणीत बुडवून टाकली आणि अनेकांना कर्जमुक्त केले. पण तुकोबांचे हे सामाजिक कार्य nondavinayt आलेले नाही. उलट निसर्गाच्या विरुद्ध जाणारे चमत्कार त्यांच्या नावावर ठेवण्यात आले असा आरोप जेष्ट विचारवंत do. आ. ह. साळुंखे यांनी केला.
सर्व शाखीय कुणबी, मराठा व बहुजन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तुकोबाराय बीज महोत्सवात ' तुकोबारायांचे सामाजिक विचार v कार्य' या विषयावर डॉ. साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सिविल लीनेस येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडचा सुनिता जिचकार आणि निलेश भोकरे यांची vyaspithavar उपस्थिती होती.
तुकारामांनी देहूच्या परिसरातील शेकडो लोकांना कर्जमुक्त केले, याचा नामोल्लेख न करता त्याच्या नावावर नोंदविण्यात alele दीडशे दैवी चमत्कार दुर्दैवी आहेत, असे स्पष्ट मत त्यानni व्यक्त केले.
एकाच माणसाला संत म्हणून महान बनविणारा आणि त्याचेच सामाजिक मूल्य दडपून टाकणारा करंत समाज आपल्याकडे आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा