सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३० एप्रिल, २०१२

पुण्याचे नामकरण ‘संभाजीनगर' करा

*अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरून साभार* -
वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा.

पुणे जिल्ह्याला मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यायला हवे. मालोजी राजे भोसले यांनी पुण्याची पायाभरणी केली. मालोजी महाराजांचे पणतु छत्रपती संभाजी महाराजांनी पुण्याच्या भूमीला आपल्या रक्ताचा अभिषेक केला. मराठ्यांच्या लढावू इतिहासाला सर्वोच्च स्थानी नेले. भोसल्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे नाव ‘संभाजीनगर'  असे ठेवण्यात यावे. येत्या १४ मे रोजी संभाजी महाराजांची जयंती आहे. त्याचे औचित्य साधून राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने हा निर्णय घ्यावा. सरकार हा निर्णय घेणार नसेल, तर  पुरोगामी विचारांच्या  संघटनांनी त्यासाठी आंदोलन करावे, असे मी या निमित्ताने सुचवू इच्छिते.


पुण्याचे संभाजीनगर असे नामांतर करणे कसे संयुक्तिक आहे, हे पाहण्यासाठी पुण्याचा धावता इतिहास पाहणे आवश्यक आहे. पुण्याला इ.स.च्या ९ व्या शतकापर्यंतचा जुना इतिहास आहे. इ.स. नवव्या शतकाच्या मध्य काळातील काही ताम्रपटांत पुन्नक या नावाचे उल्लेख असलेली छोटी वसाहत म्हणजे आजचे पुणे होय, असे इतिहासकार मानतात. ९ व्या शतकाच्या अखेरीस पुणे देवगिरीच्या यादवांनी ताब्यात घेतले. यादवांचे राज्य बुडाल्यानंतर महाराष्ट्रात मुस्लिम राज्यकत्र्यांचा अंमल सुरू झाला. या काळात पुणे वेगवेगळ्या मुस्लिम राजवटींच्या ताब्यात राहिले. या संपूर्ण काळात पुण्याचा इतिहास फार देदिप्यमान असा नव्हता. पुण्याला ऐतिहासिक झळाळी मिळवून देण्याचे काम केले ते वेरुळच्या भोसल्यांनी. आज पुण्याचे जे काही स्थान, ते केवळ आणि केवळ भोसल्यांमुळे. १५९५ मध्ये पुणे आणि सुपे ही गावे मालोजी राजे भोसल्यांना जहागिर म्हणून मिळाली. मालोजी राजांच्या ताब्यात येताच पुण्याचा उत्कर्ष सुरू झाला. हीच जहागिर वंश पुढे शहाजी राजांकडे आली. शहाजी राजांनी पुण्याचा संपूर्ण कायापालटच केला, हे सर्वज्ञात आहे.

पुणे आणि छत्रपती संभाजी राजे 

पुण्याचा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंधांबाबत येथे लिहिण्याची गरज नाही. कारण हा इतिहास जवळपास सर्वांना माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येतो. पुण्याच्या लाल महालात शिवाजी राजांचे बालपण गेले. तसेच स्वराज्यातील अनेक महत्वाचे किल्ले पुणे जिल्ह्यातच आहेत. मराठा साम्राज्याचे द्वितीय चक्रवर्ती सम्राट आणि शिवरायांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा आणि पुण्याचा संबंध लोकांना फारसा माहीत नाही. संभाजी राजांचा जन्मही पुणे जिल्ह्यातच झाला. पुण्यापासून अवघ्या २० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्ल्यात संभाजी महाराजांचा जन्म झाला. तो दिवस होता १४ मे १६५७. पुरंदर हा पुणे जिल्ह्यातला एक तालुकाही आहे. शिवरायांप्रमाणेच संभाजी महाराजांचे बहुतांश बालपणही पुणे परिसरातच गेले. महाराज २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांचे अकाली निधन झाले. जिजाऊ माँसाहेबांनी राजांचे संगोपन केले. शिवरायांप्रमाणेच त्यांच्या छाव्यालाही जिजाऊ माँसाहेबांकडून राजकारणाचे सर्व शिक्षण मिळाल्यामुळे संभाजी महाराज प्रतिशिवाजी म्हणून कर्तृत्व गाजवू शकले. संभाजी महाराज १७ वर्षांचे असताना शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजी महाराज युवराज बनले.

थोरल्या महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. मराठ्यांचे राज्य बुडविण्यासाठी दिल्लीचा सम्राट औरंगजेब ५ लक्ष फौज घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला. त्याच्या फौजेत ४ लाखांपेक्षाही जास्त हत्ती, घोडे आणि इतर जनावरे होती. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या छोट्याशा सैन्यानिशी औरंगजेबाशी सात वर्षे कडवी झुंज दिली.  औरंगजेब महाराष्ट्रभर किल्ले जिंकित  फिरला, परंतु त्याला ते कायम स्वरूपी कधीच ताब्यात ठेवता आले नाही. शेवटी औरंगजेबाने फंदफितुरीचा मार्ग अवलंबून १ फेब्रुवारी १६८९ रोजी कोकणातील संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना कैद केले. नियतीची योजना फार कठोर असते. ज्या पुणे परिसरात महाराजांचा जन्म झाला त्याच परीसरात नियतीने त्यांचा मृत्यू लिहिला होता. तसे नसते तर कोकणात पकडले असताना महाराजांना ठार मारण्यासाठी औरंगजेबाने त्यांना घाटावर आणले नसते. संभाजी महाराजांना ताब्यात घेतल्यानंतर औरंगजेबाला मराठा सैन्याकडून असलेला धोका वाढला होता. हे जाणून औरंगजेब लगोलग घाट चढून तुळापूरला आला. तुळापूर हे गाव पुण्यापासून अवघ्या ४० किमींवर आहे. पुणे जिल्ह्यातच हे गाव येते. तुळापुरात महाराजांना ठार मारण्यात आले. आणि त्यांच्या देहाचे तुकडे करून परीसरात दूरवर फेकून देण्यात आले. जवळच असलेल्या वढू बुद्रूक गावातील शूर मावळ्यांनी महाराजांच्या देहाचे तुकडे गोळा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तुळापुरात महाजांना ज्या ठिकाणी मारण्यात आले, त्या ठिकाणी कमान उभारण्यात आलेली आहे. तसेच वढू बुद्रुक गावात महाजांची समाधी आहे. ही दोन्ही स्थळे संभाजी महाराजांच्या शौर्याच्या जिवंत खुणा आहेत.
तुळापुरातील ज्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात
आले त्या जागेवर बांधण्यात आलेली स्मृती कमान.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला ब्राह्मण इतिहासकारांनी दाबून ठेवले होते. महाराजांना बदफैली ठरविण्यात आले होते. तुळापूर, वढू बुद्रुक ही खरे तर महाराष्ट्रासाठी तीर्थस्थळे व्हायला हवी होती. कारण येथे मराठ्यांचा राजा धारातीर्थी पडला होता. मात्र, ब्राह्मणी कारस्थानाचा महिमा असा की, ही स्थळे दुर्लक्षित राहिली. अलीकडे   पुरोगामी विचारांच्या  संघटनांनी ती नव्याने प्रकाशात आणली. संभाजी राजांना पकडून देण्यामागे तसेच त्यांना हाल हाल करून मारण्यामागे ब्राह्मणांचा ब्रेन होता, हे आता इतिहासकारांनी शोधून काढले आहे. येथे प्रश्न असा निर्माण होतो की, मराठ्यांनी त्या काळीच आपला योग्य तो इतिहास का लिहिला नाही. तेव्हा मराठयांनी  इतिहास लिहून ठेवला असता, तर आता जुनी कागदपत्रे धुंडाळणयचे काम पडले नसते. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, छत्रपती संभाजी महाजाराजांच्या मृत्यूनंतर मराठा सैन्य नुसते लढतच राहिले. इतर कामे करण्यास त्यांना कुठे वेळ होता. पुढची संपूर्ण २१ वर्षे मराठे लढत होते. मराठ्यांनी आपले साम्राज्य औरंगजेबाच्या हाती जाऊ दिले नाही. हतबल औरंगजेबाला महाराष्ट्रातच देह ठेवावा लागला. या संपूर्ण काळात मराठ्यांना इतिहास लिहायला किंवा आपली पूज्यस्थाने जपायला वेळ नव्हता. इतिहास लिहिण्याची जबाबदारी समाजातील विद्वान वर्गाची असते. महाराष्ट्रात ही जबाबदारी ब्राह्मणांकडे होती. ब्राह्मणांनी आपली जबाबदारी नीट पार तर पाडली नाहीच, उलट छत्रपती संभाजी राजांचा चुकीचा इतिहास प्रसृत केला. मराठे लढत होते, तेव्हा ब्राह्मण खोट्या बखरी लिहिण्यात गुंतले होते. ब्राह्मणांनी महाराष्ट्रद्रोह केला. अजूनही तो सुरूच आहे.

उपसंहार

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातला. त्यांचे बालपण पुणे जिल्ह्यात गेले. जिजाऊ माँसाहेबांनी त्यांनी राजकारणाचे बाळकडू याच जिल्ह्यात दिले. याच जिल्ह्याच्या मातीने त्यांचा मृत्यू पाहिला. महाराजांचा देह याच मातीत विलीन झाला. पुणे जिल्ह्याची माती संभाजी महाराजांनी पुण्याच्या मातीला आपल्या रक्ताने पावन केले आहे. या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्ह्याला संभाजीनगर हे नाव देणे हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. हीच लोकभावना आहे. राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने लोकभावनेचा आदर करून पुणे जिल्ह्याच्या नामांतराचा ठराव लवकरात लवकर आणावा. महाराजांचे नाव दिल्याने पुणे जिल्हा खèया अर्थाने पुण्यवंत
होणार आहे. हे पुण्यकर्म सरकारने करावेच. महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या नावाने कोणतेही शहर नाही. ही उणीव भरून काढली जायला हवी.

रविवार, ८ एप्रिल, २०१२

सांस्क्रुतिक दहशतवाद आणि प्रति-सांस्क्रुतिक दहशतवाद

मी अनिता पाटील यांचा ब्लोग नियमित वाचतो. या ब्लोगवरील रवींद्र तहकिक यांचा पु. ल. देशपांडे यांच्या वरील लेख मी वाचला. त्या बद्दल श्री. संजय सोनवणी यांनी शनिवारी ७ एप्रिलला आपल्या ब्लोगवर प्रतिक्रियात्मक लेख लिहिला आहे आणि अनिता पाटील यांनी त्यावर खाली प्रतिक्रिया दिली आहे. मी या ठिकाणी श्री. संजय सोनवणी यांचा लेख व अनिता पाटील यांची त्यावरील प्रतिक्रिया देत आहे. वाचकांनी जरूर वाचावे.
श्री. संजय सोनवणी यांचा लेख -

...तसेही अशा मुर्खांना कोण अडवू शकतो?

मी अपघाताने रवींद्र तहकीक नामक कोणा अनाम ग्रुहस्थाचे पु. ल. देशपांडे यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे लेख वाचले. मला आधी कोणीतरी माझ्या एका लेखावर प्रतिक्रिया देतांना पु.लं.वर टीका होत असल्याबद्दल लिहिले होते, पण मला विश्वास नव्हता...पण प्रत्यक्ष हे लेख वाचुन हादराच बसला. ही नुसती टीका नव्हे तर तालीबानी हल्लाच आहे याबाबत शंका नाही.

सर्वप्रथम, पु. ल. हे विनोदी लेखक होते पण त्याचवेळीस त्यांचे सामाजिक भान कधीही सुटलेले नव्हते. त्यांनी आपल्या द्न्यातीबांधवांवर अधिक व त्यांच्या शैलीत, पण कठोर टीका केलेली आहे. गांधीजींवर त्यांनी ज्या आत्मीयतेने लिहिले आहे त्याला तोड नाही. रा.स्व. प्रणित भावभावनांना कुटील विचारांना त्यांनी नेहमीच विरोध केला. सामाजिक वैगुण्यांकडे त्यांनी नेहमीच लक्ष वेधले.

साहित्त्यिक नेमका काय असतो हे या अद्न्य बांधवांना समजावुन सांगणे अत्यावश्यक आहे. मी आजवर ५८ कादंब-या आणि ९ नाटके लिहिली. साहित्यिकाचे स्रुजन हे अत्यंत व्यक्तिगत पातळीवर असते. माझ्या कादंब-या, नाटकांचे नायक ब्राह्मण आहेत तसेच क्षत्रीयही, महार आहेत तसेच मराठेही. क्लीओपात्रासारखी इजिप्तची सम्राद्न्यि आहे तसेच ग्रीक ओडिसियसही. शीबासारखीही नायिका आहे जिचा कोणता असा स्वतंत्र धर्मही नव्हता. नायक-नायिका लेखक निवडतो तो आपल्या विषयाला अनुसरुन. त्यातील भावनिकता लक्षात घेत. त्या भावनिकतेला आपल्या कथामाध्यमातुन विस्तार करत तो आपापल्या मगदुरानुसार पात्र, कथात्मकता व मनोविश्लेषनाद्वारे प्रक्षेपित करत असतो. लेखक लिहितो तेंव्हा जातीय नसतो. (अपवाद फारफारतर ऐतिहासिक कादंबरीकारांचा असू शकतो.)

पु.ल. मुळात कादंबरीकार नव्हते. पण त्यांनी "कान्होजी आंग्रे" ही मनोहर माळगांवकरांनी लिहिलेली, एक अत्यंत आदर्श नव्य शैलीतील कादंबरी, मराठीत आवर्जुन अनुवादित केली. आंग्रे काही केल्या ब्राह्मण नव्हते. माळगांवकरांनी घोडचुक केली असे हे बिनडोक लोक सहज म्हणु शकतात. त्यांनी हेमिंग्वेच्या "Old Man & The Sea" चा मुळ लेखकालाही लाजवेल असा अनुवाद केला. चुकच केली...मराठी माणसाला एका अद्भुत साहित्यिक प्रतिभेचे उदात्त रुप दाखवायची काही गरज नव्हती...असले येडचाप-मनोविक्रुत नंतर या महाराष्ट्रात जन्माला येतील याची त्यांना कल्पनाही नसावी, म्हणुन त्यांच्याकडुन असे क्रुत्य घडले असावे...असे खेदपुर्वक म्हणावे लागते.

पु.लंचा पींड तसा विनोदी लेखनाचा. त्यांनी कमरेखालचे विनोदही केले असे या रवींद्र महोदयांचे जयश्री गडकरांच्या "पार्श्वभुमी" वर म्हणने आहे. असे अनेक काही पांचट विनोद अत्रेंच्या नांवावरही खपवले जातात...पण त्या इतरांच्या विक्रुत कल्पना आहेत...वास्तव नाही हे या मुढांना माहितही नसते. विनोदी लेखन म्हणजे नेमके काय असते, त्यातील पात्रे कोणीही असू शकतात...अगदी संत महात्मेही...त्याकडे मोकळ्या मनाने पहायची मनोव्रुत्ती लागते. पु.लं.नी रामदासांवरही कोट्या केलेल्या आहेत हे मात्र पाहिले जात नाही..."विट्ठल तो आला आला..." हे मुळात चरित्रप्रधान वा ऐतिहासिक नाटक नसुन एक विनोदी प्रहसन आहे व त्याकडे त्याच द्रुष्टीने पहात समीक्षा केली पाहिजे याचे भान या ग्रुहस्थाला नाही. असेच करायचे तर मग दादा कोंडके ते पार क्रुष्णालाही वेठीला धरत प्रहसने करणारी तमाशा मंडळे याच न्यायाने बरखास्त करायला हवीत.

मागे कोणी वेडपट राम गणेश गडकरींच्या नाटकावरही तुटुन पडत त्यांचा संभाजी उद्यानातील पुतळा तोडायच्या वार्ता करत होता. मी याच ब्लोगवर त्याला उत्तर दिले होते. माझ्या मते ज्यांना साहित्य म्हनजे नेमके काय हेच समजत नाही त्यांनी उगा आपल्या लंगड्या तंगड्या अडवत विखार माजवु नये. हो, त्यांचे लेखन वैचारिक वा इतिहास मांडणारे असते तर त्यावर टीका करण्याचा अधिकार आहे आणि असतोच. पण कलाक्रुतीवरची टीका ही कलाक्रुतीच्याच सामर्थ्य/वैगुण्ये याच आधारावर होवू शकते...जातीय नाही.

महाराष्ट्राला तसेही विनोदाचे वावडे आहे. काही जातीघटकांना तर अधिकच. अत्रे-पु.लंनी महाराष्ट्राला हसवायला शिकवले हे ऋण मान्य करायलाच हवे. उलट हे आताचे जातीय वीर मात्र दिसला ब्राह्मण कि झोड या कुव्रुत्तीचे बळी ठरत आहेत आणि त्यातच त्यांचा सांस्क्रुतिक -हास आहे.

उद्या कोणी जी. ए. कुलकर्णींवरही असलेच वाह्यात लिहू लागेल. ज्यांच्यामुळे सांस्क्रुतीक गोंधळ झाला अशांबद्दल लिहिले-बोलणे वेगळे आणि ज्यांनी संस्क्रुती व्रुद्धीत हातभारच लावला त्यांच्याबद्दल अधमपणे लिहिणे-वक्तव्य करणे वेगळे याचे भान असायला हवे. नाहीतर साहित्यिकांना आपल्या लेखण्या बाजुला ठेवुन मुक्त श्वास न घेता आल्यामुळे चक्क काढता पाय घ्यावा लागेल...आणि मग संस्क्रुती रसातळाला जायला वेळ लागणार नाही. आपापल्या जातीचे साहित्य आपणच निर्माण करायचे आणि आपणच वाचायचे असला नवा उद्योग सुरु होईल.

असेच करायचा विचार असेल तर करा...तसेही अशा मुर्खांना कोण अडवू शकतो?
अनिता पाटील यांची प्रतिक्रिया -
पु. ल. देशपांडे, साने गुरुजी, कुसुमाग्रज
ही मंडळी सर्व नियमांच्या वर आहे का?

तुम्ही म्हणता ते लिखाण माझ्या ब्लॉगवरचे आहे. श्री. तहकीक यांनी लेखात वापरलेली भाषा तिखट आहे. मी स्वत: अशा भाषेच्या विरोधात आहे. माझ्या ब्लॉगवर या घडीला २०० पानांचा मजकूर आहे. या संपूर्ण मजकुरात अशी भाषा तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तरीही मी श्री. तहकीक साहेबांचे लेख माझ्या ब्लॉगवर टाकले. त्यांना एडिqटग मंजूर नव्हते. मला सत्य लोकांसमोर आणायचे होते. सत्यासाठी थोडीशी किम्मत मोजावीच लागते. तहकीक यांचे लेख टाकून मी ती मोजली.

दुसरे असे की, आपला विरोध कशाला आहे, हे स्पष्ट होत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याची चिरफाड करताना त्यांनी पुल यांचा एकेरी उल्लेख केला त्याला आपला विरोध आहे का? की तहकीक यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्यांना आहे? की दोन्हींना आहे.

तहकीक यांनी जी भाषा वापरली, तिला आपला विरोध आहे, असे आपले म्हणणे असेल, तर ते मला मान्य आहे. तथापि, श्री. तहकीक यांनी मांडलेल्या मुद्यांना आपला विरोध असेल, तर मात्र मोठी समस्या आहे.

लेखन विनोदी आहे, म्हणून महापुरुषांचे चारित्र्य हनन खपवून घ्यायचे का? हा यातील सर्वांत मोठा प्रश्न आहे. बायकोच्या जाचाला कंटाळून तुकाराम देवध्यानी लागले, तुकारामांचे टाळकरी छंदी फंदी होते, असा स्पष्ट संदेश पु ल देशपांडे यांचे नाटक देते. याला विनोद नव्हे चारित्र्यहनन म्हणतात. चारित्र्य हनन करणारी व्यक्ती पुल देशपांडे आहे, म्हणून सहन करून घ्या, असा पवित्रा कोणालाही घेता येणार नाही. पुलंच्या या लिखाणाला कुणी विनोद म्हणणार असेल, तर त्यापेक्षा दुसरा मोठो विनोद असू शकत नाही.

माझ्या ब्लॉगवर साने गुरूजी, कुसुमाग्रज, विन्दा करंदीकर, वि. स. खांडेकर यांच्या साहित्याची समीक्षा करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत महाराष्ट्रातील तमाम ब्राह्मण वर्गातून कडवट विरोध होत आहे. विशिष्ट व्यक्तींच्या साहित्याची योग्य समीक्षाच करायचीच नाही, ही मानसिकता केवळ मराठी भाषिकांमध्येच असू शकते. ही लेखक मंडळी मोठी आहेत qकवा जातीने ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांना हात लावायचा नाही, असे कोणी म्हणत असेल, तर आपल्याला ते मान्य आहे का?

अनेक ब्राह्मण लेखकांनी बहुजन महापुरुषांबद्दल कथा कादंबèया लिहिल्या आहेत, हे आपले म्हणणे अगदी योग्य आहे. अशा उत्तम लिखाणाबद्दल सर्वांनाच आदरही आहे. तथापि, या लिखानाच्या बदल्यात कोणी जर आमच्या महापुरुषांची बदनामी करण्याची परवानगी मागत असेल, तर ती आम्ही देऊ शकत नाही. जे वाईट आहे, त्याला वाईट म्हणण्याचा आमचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

आपण अत्र्यांचे नाव घेतले आहे. अत्र्यांनी जी भाषा वापरली आहे, ती तुम्हाला सांगण्याची गरज नाही. श्री. तहकीक यांची भाषा त्यापुढे अगदीच फिकी आहे. ज्या महात्मा फुल्यांचा वारसा तुम्ही आम्ही सांगतो, त्यांनीही यापेक्षा जहाल भाषा वापरली आहे. येथे मुद्दा भाषेचा नाहीच. मुद्दा आहे, चारित्र्य हननाचा. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही चारित्र्य हनन करण्याचा परवाना दिला जाऊ शकत नाही.

सोनवणी साहेब, मी आपला ब्लॉग नियममित वाचते. आपल्या काही मुद्यांबाबत माझे मतभेद असले तरी मला आपले लिखाण आवडते. असो. मी तुमचा ब्लॉग वाचते, म्हणून तुम्ही माझ्या लिखाणाला पाqठबा द्या, अशी माझी भूमिका नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की, कोणतीही भूमिका घेताना ती न्याय्य आहे, हे पाहिले पाहिजे.

असो. लहान तोंडी मोठा घास घेतला, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल, याची खात्री आहे.

ता. क.
मला विकृत म्हणणाèयांनी माझ्या ब्लॉगला भेट द्यावी. मला शिव्या देणाèया ब्राह्मणांच्या कॉमेंटस मी ब्लॉगवर कायम ठेवल्या आहेत. त्या वाचाव्यात आणि मग भाषिक शूचितेबाबत बोलावे. (http://anita-patil.blogspot.in/)

आपलीच लहान बहीण
अनिता पाटील.
Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.