कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

!...क्रांतिची फुले...!


काल 'महात्मा फुलेच्या'
'पुतळ्याला' फुले वाहत होतो,
मनात त्यांच्या विचाराच एक स्वप्न पाहत होतो.
...

विचार करता करता 'आश्चर्य' झाले,
अन 'पुतळ्यातुन' महात्मा मह्यासमोर आले.
अंगावरची 'धुळ' झटकत त्यानी
'फेटा' नीट केला,
अन् म्हणाले, 'नागा, लय दिवसांनी इकड आला ?'

म्या म्हणलो,
'आज तुमची 'पुण्यतिथी', म्हणल जावुन येवाव,
अन् 'समाजसेवेच्या' कार्यात सहभाग घ्यावाव'.

महात्मा म्हणाले,
'नागा, 'जयंत्या' करुन
समाजसेवा व्हणार नाय,
अन् 'मुलनिवाशी' यांच दुःख दुर जाणार नाय.'

म्या म्हणलो,
'मुलनिवाशीयांना असं दुःख तरी काय ?
अन् खरच हे दुर जाणार कस नाय ?

महात्मा म्हणाले,
'नागा, मी पण 'परांजपे' च्या लग्नात 'अपमान' सहन केला,
'सनातनी' ब्राम्हणाकडुन 'खुनाचा' प्रयत्न पण झाला,
'सावित्री' च्या अंगावर फेकला
'शेणा दगडाचा' घाला,
ही 'अस्पृशाची कैफियत' काय सांगु नागा तुला'.


मला आश्चर्य वाटल,
म्या म्हणल,
'एव्हढ तुम्हाला त्या काळी छळल,
अन् आम्हाला हे आतापर्यत नाही कळलं'.

महात्मा म्हणाले, 'नागा,
अरे मनुवाद्याने असे खुप 'कावे' केले,
शिवाजीचा 'अंत' पाहिला अन् संभाजीचे 'तुकडे' केले,
'कबीराला' संपवुन चलाखिने तुकारामास 'वैकुंठा' नेले,
'ईतिहास झाकुन' खरा, देवाची
'हाडे चघळाय' दिले'.

म्या म्हणल,
'आता ही परिस्थिती कदापि नाय,
एखादी असली तर मग सोबत
'कायदा' हाय'.

महात्मा म्हणाले,
'नागा, 'बिळाच्या' बाहेर येवुन तु कधी पाहणार,
स्वतःच्या 'संसारात' गुंतला तु समाजात काय राहणार,

आजही 'खैरलांजी' डोळ्या समोर घडतो,
आजही तो 'बाबरीच्या' एक एक
'विटा' पाडतो,
आजही 'बहुजन' तिरस्काराच्या नाल्यात सडतो,
आजही 'तो' डोक्यावर पाय देवुन तुमच्या वरे चढतो,
आजही हा 'मुलनिवासी' गटागटात लढतो,
अन् आजही 'रामदास' मनुवाद्याच्या पाया पडतो,
ईथे 'एकीच्या' लढाईला प्रत्येकाचा 'स्वार्थ' नडतो,
तेव्हात मुलनिवाशीयावर
'अन्याय' वाढतो,
भुक, गरीबी, अत्याचारात त्याचा पाय आडतो,
बघ नागा,
आजही तुझा समाज 'ढसा ढसा' लडतो,
आजही तुझा समाज 'ढसा ढसा' लडतो.

म्या डोळ्याच 'पाणी' पुसत म्हणालो,
'आता यावर तुम्ही उपाय सांगा,
नाही हटणार मी, आता झालोय जागा.'

महात्मा म्हणाले,
'नागा, 'ब्राम्हणाचे कसब' माहित आहे तुला,
मग घे 'आसुड' अन् तोडुन टाक
'गुलामगीरीला',
'शिवरायांच्या' विचारांचा मनी ध्यास घे,
कापत सुट 'अन्यायाला' मगच
'श्वास' घे,
भिमरायाची 'लेखनी' आत्मसात कर,
अन् मनुवाद्याचा 'एकजुटीने घात' कर
'विद्रोही तुकाराम' तुझ्या अंगात येवु दे,
अन् 'मनात बिरसा' असाच तळपत राहू दे,
अशीच तुझ्या विचारांना कायमची 'धार' राहिल,
तर एक दिवस,
नक्किच 'मनुवाद्याची हार' होईल,
नक्किच 'मनुवाद्याची हार' होईल...!'

.
.
.
.
पुतळ्यातला महात्मा 'शांत' झाला,
पण, माझ्या 'मनात आग' लावुन गेला.

आता,
ठरवलं 'विभागुन' जायायच नाही,
कदापि 'मागे वळुन' पाहायच नाही,
अन् मुलनिवाशी यातिल
'भेदभाव' मिटवुन
'क्रांति' घडवल्याशिवाय राहायच नाही....
'क्रांति' घडवल्याशिवाय राहायच नाही....



कवी: अभय भिमराव नागवंशी (नाग)
और आगे देखें
!...क्रांतिची फुले...!

काल 'महात्मा फुलेच्या'
'पुतळ्याला' फुले वाहत होतो,
मनात त्यांच्या विचाराच एक स्वप्न पाहत होतो.

विचार करता करता 'आश्चर्य' झाले,
अन 'पुतळ्यातुन' महात्मा मह्यासमोर आले.
अंगावरची 'धुळ' झटकत त्यानी
'फेटा' नीट केला,
अन् म्हणाले, 'नागा, लय दिवसांनी इकड आला ?'

म्या म्हणलो,
'आज तुमची 'पुण्यतिथी', म्हणल जावुन येवाव,
अन् 'समाजसेवेच्या' कार्यात सहभाग घ्यावाव'.

महात्मा म्हणाले,
'नागा, 'जयंत्या' करुन
समाजसेवा व्हणार नाय,
अन् 'मुलनिवाशी' यांच दुःख दुर जाणार नाय.'

म्या म्हणलो,
'मुलनिवाशीयांना असं दुःख तरी काय ?
अन् खरच हे दुर जाणार कस नाय ?

महात्मा म्हणाले,
'नागा, मी पण 'परांजपे' च्या लग्नात 'अपमान' सहन केला,
'सनातनी' ब्राम्हणाकडुन 'खुनाचा' प्रयत्न पण झाला,
'सावित्री' च्या अंगावर फेकला
'शेणा दगडाचा' घाला,
ही 'अस्पृशाची कैफियत' काय सांगु नागा तुला'.


मला आश्चर्य वाटल,
म्या म्हणल, 
'एव्हढ तुम्हाला त्या काळी छळल,
अन् आम्हाला हे आतापर्यत नाही कळलं'.

महात्मा म्हणाले, 'नागा,
अरे मनुवाद्याने असे खुप 'कावे' केले,
शिवाजीचा 'अंत' पाहिला अन् संभाजीचे 'तुकडे' केले,
'कबीराला' संपवुन चलाखिने तुकारामास 'वैकुंठा' नेले,
'ईतिहास झाकुन' खरा, देवाची
'हाडे चघळाय' दिले'.

म्या म्हणल, 
'आता ही परिस्थिती कदापि नाय,
एखादी असली तर मग सोबत
'कायदा' हाय'.

महात्मा म्हणाले, 
'नागा, 'बिळाच्या' बाहेर येवुन तु कधी पाहणार,
स्वतःच्या 'संसारात' गुंतला तु समाजात काय राहणार,

आजही 'खैरलांजी' डोळ्या समोर घडतो,
आजही तो 'बाबरीच्या' एक एक
'विटा' पाडतो,
आजही 'बहुजन' तिरस्काराच्या नाल्यात सडतो,
आजही 'तो' डोक्यावर पाय देवुन तुमच्या वरे चढतो,
आजही हा 'मुलनिवासी' गटागटात लढतो,
अन् आजही 'रामदास' मनुवाद्याच्या पाया पडतो,
ईथे 'एकीच्या' लढाईला प्रत्येकाचा 'स्वार्थ' नडतो,
तेव्हात मुलनिवाशीयावर
'अन्याय' वाढतो,
भुक, गरीबी, अत्याचारात त्याचा पाय आडतो,
बघ नागा, 
आजही तुझा समाज 'ढसा ढसा' लडतो,
आजही तुझा समाज 'ढसा ढसा' लडतो.

म्या डोळ्याच 'पाणी' पुसत म्हणालो,
'आता यावर तुम्ही उपाय सांगा,
नाही हटणार मी, आता झालोय जागा.'

महात्मा म्हणाले,
'नागा, 'ब्राम्हणाचे कसब' माहित आहे तुला,
मग घे 'आसुड' अन् तोडुन टाक
'गुलामगीरीला',
'शिवरायांच्या' विचारांचा मनी ध्यास घे,
कापत सुट 'अन्यायाला' मगच
'श्वास' घे,
भिमरायाची 'लेखनी' आत्मसात कर,
अन् मनुवाद्याचा 'एकजुटीने घात' कर
'विद्रोही तुकाराम' तुझ्या अंगात येवु दे,
अन् 'मनात बिरसा' असाच तळपत राहू दे,
अशीच तुझ्या विचारांना कायमची 'धार' राहिल,
तर एक दिवस,
नक्किच 'मनुवाद्याची हार' होईल,
नक्किच 'मनुवाद्याची हार' होईल...!'

.
.
.
.
पुतळ्यातला महात्मा 'शांत' झाला,
पण, माझ्या 'मनात आग' लावुन गेला.

आता,
ठरवलं 'विभागुन' जायायच नाही,
कदापि 'मागे वळुन' पाहायच नाही,
अन् मुलनिवाशी यातिल
'भेदभाव' मिटवुन
'क्रांति' घडवल्याशिवाय राहायच नाही....
'क्रांति' घडवल्याशिवाय राहायच नाही....



कवी: अभय भिमराव नागवंशी (नाग)

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२

!.....एक स्वप्न.....!

https://www.facebook.com/groups/117247671728910/permalink/288591231261219/

Abhay Bhimrao Nagwanshi


काल रात्री स्वप्नात मह्या 'बाबा' आले,
मह्याकडे पाहताच 'धीरगंभीर' झाले.

बाबा म्हणाले, ' नागाच्या वंशजा आज काय विशेष माहित आहे तुला,
म्या म्हणल, 'बाबा माफ करा कालच 'गुरु पोर्णिमे' चा दिवस झाला,
'तुळसीच्या लग्नात' जेवुन हात धुतले की,
तितक्यातच 'मोहरम' आला '.

हातातल 'पुस्तक' दाखवत बाबा म्हणाले,
हे काय 'ओळखतोस' का या पुस्तकाला ?
मला वाटल बाबा आता घेतात माही 'शाला',
म्या बाबाला प्रामाणिकपणे म्हणलो,
माहित नाय बाबा थोडा शरमेने कंणलो,

बाबा म्हणाले, 'नागा हे तुझ्या मुक्तीच व्दार,
तुकारामाचा 'अभंग', शिवाजीची
'तलवार'
कबीराचा 'दोहा', बसवेश्वराचा
'सत्कार'
फुले, पेरीयारची 'कडक वाणी', शाहुचे 'सरकार'
जिजाऊची 'ममता' अन् बिरसाचा 'अधिकार'

एव्हढ सगळ ऐकाच पुस्तकात
म्या म्हणल बाबा,
याच नाव तरी काय ?
अन् तुम्ही सांगता ते कितपत खर हाय ?

बाबा म्हणाले,
'नागा, याचं नाव 'भारताचे संविधान'
फुटेल मुक्याला 'वाचा' अन् बहिर्याला 'कान',
दांभिकाला 'रट्टा' अन् स्त्रियांना
'आत्मसम्मान'
गरीबाला 'प्रेमाची साथ' अन् दुबळ्याला 'प्रथम स्थान',

मला आश्चर्य वाटलं,
मग म्या म्हणल बाबा,
'संविधान असतांना का हो
'खैरलांजी' घडावा,
'बाबरी मस्जिद' पाडुन का भाऊ आपसात लढावा,
शेतकर्याला 'आत्महत्या' करण्याचा प्रसंग का पडावा,
'स्त्रि-दलित अत्याचार' यात देह का सडावा,
'भ्रष्ट्राचाराच्या' पायी का आमचा पाय आडावा,
अन् 'गरीबाच्या पदरी' का तिरस्काराचा धोंडा पडावा

बाबा थोड्या वेळासाठी 'नाराज झाले'
पाहताच त्यांच्या 'डोळ्यात अश्रु' आले
म्या म्हणल बाबा, रडताय का तुम्ही ?
चुक झाली का माझी, गलत बोललो का मी ?

बाबा म्हणाले, नागा तुझ बरोबर आहे,
या सर्व गोष्टीची मलाही खंत आहे,

पण नागा,
'संविधान किती चांगले असेल तरी नाही फायदा होईल,
'मनुवादी' असतील चालवणारे मग ही 'मनुस्मृती' च राहिल,
मनुच्या राज्यात सर्व काही
'अराजक' होईल,
प्रत्येकजण 'अत्याचारात लाचारीत' राहील,

पण,
जर का 'बहुजन' संविधान आपल्या हातात घेईल
मग पुन्हा 'मुलनिवासि' यांचे राज्य येईल

तेव्हा राहणारच नाही कुणी
'तहानलेला उपाशी' ,
शेतकरी घेणारच नाही
'आत्महत्येची फाशी',
मग विषयच राहणार नाही
'अन्ना-केजरीवाल' पाशी,
'समीक्षा' करणार्याला 'अटल' दाखवु 'बिहार काशी',

मग 'साध्वी' चा नाद हटेल अन्
'स्वंय सेवका' चा पडदा फाटेल,
'कसाब' ला मृत्युदंड अन् पुन्हा
'अफजल' ला भिती वाटेल

'राजा अशोक-शिवाजीं' च्या स्वप्नाला साकार करु,
'भगवा निळा हिरव्या' रंगाला
'एकच रंगाचा' सार करु,

मग कोणी मनुच 'बाळ' तुम्हाला विभागणार नाही,
'रामदास' ला 'आठवेल' शहाणपण सत्तेसाठी झुकणार नाही,
'नक्षलवादी आतंकवादी' बुद्ध चरणी 'बंदुक' अर्पण करतील,
'विचारवादी' बनुन हक्क स्वाभिमानाने जगतील,

मग म्या म्हणल, 'बाबा हे केव्हा होईल,'
बाबा उद्गारले
'नागा,
विभागलेला 'मुलनिवाशी' जेव्हा एकत्र येईल,
अत्याचार करणार्याचा विरोध होईल,
जेव्हा 'संविधानाची माहिती' प्रत्येकापर्यत जाईल,
तेव्हाच 'बळीच राज येईल'
तेव्हाच 'बळीच राज येईल'

बाबाच्या 'डोळ्यात' आता एक
'तेज' वाटले,
खरच, राजेहो मला संविधानाचे
'महत्व पटले',

पण,
पाहताच बाबा....'अदृश्य' झाले,
अरे हे काय माझे 'स्वप्न' तुटले,

पण, 'बाबाच्या स्वप्नाला' आपण तुटु द्यायच नाही,
संविधानाच महत्व समजावुन देवु ठायी ठायी,
चला एकत्र होवुन 'अन्याया विरुद्ध लढु',
आता,
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही...,!'
आता,
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही.....!'



कवी: अभय भिमराव नागवंशी (नाग)
!.....एक स्वप्न.....!


काल रात्री स्वप्नात मह्या 'बाबा' आले,
मह्याकडे पाहताच 'धीरगंभीर' झाले.

बाबा म्हणाले, ' नागाच्या वंशजा आज काय विशेष माहित आहे तुला,
म्या म्हणल, 'बाबा माफ करा कालच 'गुरु पोर्णिमे' चा दिवस झाला,
'तुळसीच्या लग्नात' जेवुन हात धुतले की,
तितक्यातच 'मोहरम' आला '.

हातातल 'पुस्तक' दाखवत बाबा म्हणाले,
हे काय 'ओळखतोस' का या पुस्तकाला ?
मला वाटल बाबा आता घेतात माही 'शाला',
म्या बाबाला प्रामाणिकपणे म्हणलो,
माहित नाय बाबा थोडा शरमेने कंणलो,

बाबा म्हणाले, 'नागा हे तुझ्या मुक्तीच व्दार,
तुकारामाचा 'अभंग', शिवाजीची 
'तलवार'
कबीराचा 'दोहा', बसवेश्वराचा
'सत्कार'
फुले, पेरीयारची 'कडक वाणी', शाहुचे 'सरकार'
जिजाऊची 'ममता' अन् बिरसाचा 'अधिकार'

एव्हढ सगळ ऐकाच पुस्तकात
म्या म्हणल बाबा,
याच नाव तरी काय ?
अन् तुम्ही सांगता ते कितपत खर हाय ?

बाबा म्हणाले,
'नागा, याचं नाव 'भारताचे संविधान'
फुटेल मुक्याला 'वाचा' अन् बहिर्याला 'कान',
दांभिकाला 'रट्टा' अन् स्त्रियांना
'आत्मसम्मान'
गरीबाला 'प्रेमाची साथ' अन् दुबळ्याला 'प्रथम स्थान',

मला आश्चर्य वाटलं,
मग म्या म्हणल बाबा,
'संविधान असतांना का हो
'खैरलांजी' घडावा,
'बाबरी मस्जिद' पाडुन का भाऊ आपसात लढावा,
शेतकर्याला 'आत्महत्या' करण्याचा प्रसंग का पडावा,
'स्त्रि-दलित अत्याचार' यात देह का सडावा,
'भ्रष्ट्राचाराच्या' पायी का आमचा पाय आडावा,
अन् 'गरीबाच्या पदरी' का तिरस्काराचा धोंडा पडावा

बाबा थोड्या वेळासाठी 'नाराज झाले'
पाहताच त्यांच्या 'डोळ्यात अश्रु' आले
म्या म्हणल बाबा, रडताय का तुम्ही ?
चुक झाली का माझी, गलत बोललो का मी ?

बाबा म्हणाले, नागा तुझ बरोबर आहे,
या सर्व गोष्टीची मलाही खंत आहे,

पण नागा,
'संविधान किती चांगले असेल तरी नाही फायदा होईल,
'मनुवादी' असतील चालवणारे मग ही 'मनुस्मृती' च राहिल,
मनुच्या राज्यात सर्व काही
'अराजक' होईल,
प्रत्येकजण 'अत्याचारात लाचारीत' राहील,

पण,
जर का 'बहुजन' संविधान आपल्या हातात घेईल
मग पुन्हा 'मुलनिवासि' यांचे राज्य येईल

तेव्हा राहणारच नाही कुणी
'तहानलेला उपाशी' ,
शेतकरी घेणारच नाही
'आत्महत्येची फाशी',
मग विषयच राहणार नाही
'अन्ना-केजरीवाल' पाशी,
'समीक्षा' करणार्याला 'अटल' दाखवु 'बिहार काशी',

मग 'साध्वी' चा नाद हटेल अन्
'स्वंय सेवका' चा पडदा फाटेल,
'कसाब' ला मृत्युदंड अन् पुन्हा
'अफजल' ला भिती वाटेल

'राजा अशोक-शिवाजीं' च्या स्वप्नाला साकार करु,
'भगवा निळा हिरव्या' रंगाला
'एकच रंगाचा' सार करु,

मग कोणी मनुच 'बाळ' तुम्हाला विभागणार नाही,
'रामदास' ला 'आठवेल' शहाणपण सत्तेसाठी झुकणार नाही,
'नक्षलवादी आतंकवादी' बुद्ध चरणी 'बंदुक' अर्पण करतील,
'विचारवादी' बनुन हक्क स्वाभिमानाने जगतील,

मग म्या म्हणल, 'बाबा हे केव्हा होईल,'
बाबा उद्गारले
'नागा,
विभागलेला 'मुलनिवाशी' जेव्हा एकत्र येईल,
अत्याचार करणार्याचा विरोध होईल,
जेव्हा 'संविधानाची माहिती' प्रत्येकापर्यत जाईल,
तेव्हाच 'बळीच राज येईल'
तेव्हाच 'बळीच राज येईल'

बाबाच्या 'डोळ्यात' आता एक
'तेज' वाटले,
खरच, राजेहो मला संविधानाचे
'महत्व पटले',

पण,
पाहताच बाबा....'अदृश्य' झाले,
अरे हे काय माझे 'स्वप्न' तुटले,

पण, 'बाबाच्या स्वप्नाला' आपण तुटु द्यायच नाही,
संविधानाच महत्व समजावुन देवु ठायी ठायी,
चला एकत्र होवुन 'अन्याया विरुद्ध लढु',
आता, 
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही...,!'
आता,
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही.....!'



कवी: अभय भिमराव नागवंशी (नाग)
Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.