सोमवार, ७ मे, २०१२

स्वराज्याची सुरवात

या पुढे मी छ. शिवराय आणि रामदास या विषयावर ही लेखमाला देत आहे.
१) रामदास हे लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेले...हे सगळ्यांना  माहीतच असेल...
जन्म - १६०८ ... १२ वर्षाचे म्हणजे १६२० ला ते लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेले...असो त्यानंतर म्हणे त्यांनी १२ वर्षे नाशिकला राम भक्तीत घालवली....आणि त्या नंतर १२ वर्षे भारत भ्रमंतीला गेले....

(१२ -१२ -१२ वर्षांचा similarity हा बहुतेक योगायोगच असावा..रामदासांनी बऱ्याच गोष्टी १२ -१२ -१२ वर्षांनी केलेल्या दिसतात..) असो म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी ते भारत भ्रमंतीला गेले.. १६३४ .... नंतर १२ वर्षांनी परत आले १६४६-१६४७ ला ......
        शिवाजी महाराजांनी स्वराज्य साठी १६४५ ला त्यांनी दादोजी नरसप्रभू देशपांडे यास एक पत्र लिहिले. तसेच १६४६ ला न्यायनिवाडाविषयक एका पत्रात शिरोभागी शिवाजी महाराजांची मुद्रा आढळते...
तसेच शिवरायांनी १६४७ मध्ये तोरणा आणि राजगड हे दोन किल्ले घेतले....
१६४७ च्या दिवाळीत पुरंदर किल्लाही मोठ्या कौशल्याने आपल्या वर्चस्वाखाली आणला...
स्वराज्य प्राप्तीची जमवाजमव १६४५ साली सुरु करण्यात आली....त्या मूळे इथे रामदासांचा काडीचा संबंध नाही हे सिद्ध होते...
          कारण रामदास हे १६४६ ला परिसरात आले.....असो.. ते जेव्हा आले त्या नंतर त्यांचे खरे काम चालू झाले त्या मूळे त्या आधी ते प्रसिद्ध असणे हे पटण्यासारखे नाही....काही जणांच्या मते रामदास १६४४ ला चाफळ इथे आले व त्यांनी तिथे कामास सुरवात केली.....त्यांनी प्रथम रामाची मूर्ती स्थापन करून रामजन्मोत्सव चालू केला..अश्या पद्धतीने त्यांनी कार्यास सुरवात केली....पुढे त्यांनी रामाला अनुसरून हनुमान भक्ती प्रचलित आणायला चालू केली.....रामदास पंथाची स्थापना १६४९ ला झाली....
        काही जन १६४९ ला रामदासांचा अनुग्रह महाराजांनी घेतला असे खोटे दावे करतात......रामदास शिवाजी महाराजांच्या शत्रूच्या आश्रयी ( बाजी घोरपडे यांचे कडे) असतांना शिवाजी महाराज रामदासांचा अनुग्रह घेतात हे पटण्यासारखेच नाही....बाजी घोरपडेंनी व आदिलशाहने रामदासांच्या चाफळ देवस्थानाला काही जमिनी इनाम दिल्या. त्यामुळे बाजी घोरपडे आणि मुरार जगदेव हे आदिलशहाचे सरदार चाफळ देवस्थानाचे विश्वस्त होते.
 
 
संतोष पवार यांच्या http://www.ramadasswami.blogspot.in या ब्लॉगवरून साभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा